CM Yogi Adityanath On Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. या ‘एअर स्ट्राईक’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवाद्यांच्या ९ तळांना लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

तसेच भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबाचा देखील खात्मा झाला आहे. दरम्यान, भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी हल्ल्याला भारत अशाच प्रकारचं प्रत्युत्तर देणार आणि हा नवा भारत असल्याचं असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

“भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत तिन्ही दलांच्या प्रमुखांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो. ऑपरेशन सिंदूर ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या बहिणींबद्दल आपल्या सुरक्षा दलांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संवदेना आहे. ज्यांनी आपल्या बहिणी आणि मातांच्या पतींना मारण्याचं धाडस केलं, त्यांना भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये संपूर् कुटुंब गमावलं लागलं आहे. दुस्मनांच्या अशा प्रकारच्या हरकतीचं हा नवा भारत अशाच मजबूतीने प्रत्युत्तर देणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे दाखवून देखील दिलं. ही भाराताची तादक आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

‘एअर स्ट्राईक’मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० तर निकटवर्तीय असलेल्या ४ सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे.तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफाचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.