गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली. भारताने या खेळांमध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदाकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेल्या ६४ पदकांच्या तुलनेत यंदाची भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल ठरली. गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर २००२मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासाठी नेमबाजीचा इव्हेंट खुपच चांगला राहिला. नेमबाजीत यावेळी भारतीय नेमबाजांनी ७ सुवर्ण पदकांसह १६ पदके कमावली. अनिश भानवाला, मेहुली घोष आणि मनू भाकर यांसारख्या तरुण नेमबाजांशिवाय हिना सिद्धू, जितू राय आणि तेजस्विनी सावंत यांसारख्य अनुभवी नेमबाजांनीही भारतासाठी पदके जिंकली. मात्र, गगन नारंगसाठी यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा खास राहिली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commonwealth games 2018 india earns 66 medals third place in the list of wining countries
First published on: 15-04-2018 at 11:36 IST