केंद्रीय गृह विभागाचे स्पष्टीकरणनवी दिल्ली : ‘भारताचा राष्ट्रध्वज देशवासीयांच्या आशा आणि आकांक्षेचे प्रतीक आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. राष्ट्रध्वजाबाबत प्रेम आणि निष्ठा असली तरी सरकारी संस्था, यंत्रणा आणि नागरिकांमध्ये ध्वजसंहितेबाबतच्या जागृतीचा अभाव असल्याचे दिसून येते,’ असे सांगत केंद्रीय गृह विभागाने भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे सक्तीने पालन करणे आवश्यक आहे, असे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्वजसंहितेबाबत केंद्रीय गृह विभागाने सोमवारी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा अवमान न होण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय ध्वजसंहितेनुसार सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धेसह महत्त्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमांत केवळ कागदी ध्वजाचाच वापर केला जातो. मात्र कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान केला जात असल्याचे दिसून येते. ध्वज फाडणे, जमिनीवर फेकणे, त्याचे नुकसान करणे अत्यंत चूक असून राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने या वेळी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compliance with the flag code is mandatory central home department akp
First published on: 19-01-2022 at 00:16 IST