scorecardresearch

Premium

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशीची काँग्रेसची मागणी

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली

congress
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. मणिपूरमध्ये तातडीने शांतता निर्माण करण्यासाठी काँग्रेसने १२ मागण्यांचे पत्र देऊन मुर्मू यांना हस्तक्षेपाची विनंती केली.

मणिपूरमधील कुकी व मेईती जमातींमधील वाद विकोपाला गेला असून हिंसक घटना थांबवण्यात बीरेन सिंह यांचे भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संघ व भाजपचे विभाजनवादी राजकारण या हिंसाचाराला कारणीभूत आहे. त्यांच्या फुटीच्या राजकारणामुळे सध्या मणिपूरमध्ये हिंसेचा वणवा पेटला आहे. मणिपूरमध्ये २२ वर्षांपूर्वी केंद्रात भाजपची सत्ता असताना हिंसाचार झाला होता. यावेळी तर परिस्थिती वाईटाकडून अतिवाईटाकडे गेली आहे, असे टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 00:16 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×