Mani Shankar Aiyar On Gandhi Family : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आळे आहेत. मणिशंकर अय्यर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अय्यर यांनी गांधी कुटुंबासंबंधी काही दावे केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मागील १० वर्षात त्यांना फक्त एक वेळा सोनिया गांधी यांना भेटण्याची संधी मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच गांधी कुटुंबाने माझी राजकीय कारकीर्द घडवली आणि बिघडवली, तरीही मी भाजपामध्ये जाणार नाही, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले आहेत.

अय्यर म्हणाले की, “मला १० वर्ष सोनिया गांधींना समोरा-समोर भेटण्याची एकही संधी दिली गेली नाही. राहुल गांधींबरोबर एक प्रसंग वगळता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळालेली नाही. तर मी प्रियांका गांधी यांच्याबरोबर भेट झाली नाही, एक दोन प्रसंग वगळता आम्ही कधी एकत्र आलो नाही, त्या माझ्याबरोबर फोनवर बोलत असतात, म्हणून मी त्यांच्या संपर्कात आहे”.

नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
Image Of Sonia Gandhi And Draupadi Murmu
Sonia Gandhi : राष्ट्रपतींविरोधातील टीका भोवणार? सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा नोंदवण्याची मागणी
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील

पुढे बोलताना अय्यर म्हणाले की, “माझ्या आयुष्यातील विडंबना ही आहे की माझी राजकीय कारकीर्द गांधींनी घडवली आणि गांधींनींच बिघडवली. मला पक्षाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मी अजूनही पक्षाचा सदस्य आहे. मी पक्ष कधीही बदलणार नाही, आणि मी भाजपमध्ये नक्कीच जाणार नाही”. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

अय्यर यांनी सांगितले की, एकदा राहुल गांधी यांना शुभेच्छा पाठवण्यासाठी त्यांना प्रियांका गांधी यांना फोन करावा लागला होता. तसेच सोनिया गांधी यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या ङोत्या तर मॅडमनी मी ख्रिश्चन नाही असे म्हटले होते.

हेही वाचा>> छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”…

मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे की २०२४ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधी यांना तिकीट दिले नाही आणि राहुल गांधी म्हणाले होते की कुठल्याही परिस्थितीत मणिशंकर अय्यर यांना तिकीट दिले जाणार नाही, कारण ते म्हातारे झाले आहेत. अय्यर तामिळनाडूच्या मयिलादुथुराऊ येथून तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत आणि राज्यसभेत खासदारदेखील राहिले आहेत.

Story img Loader