नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नसल्याने शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. दुसरीकडे हे आंदोलन नेमकं कधीपर्यंत चालणार हेदेखील अस्पष्ट आहे. २६ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठवत आंदोनालास सुरुवात केली. ऊन, थंडी, करोना कशाचीही चिंता न करता आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

आपल्या मागण्यांसाठी लढणाऱ्या ५०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अद्यापही कायदा रद्द करण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. किसान एकता मोर्चाने ट्वीट करत लढा सुरु होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटोही शेअर केले आहेत. जोपर्यंत विजय होत नाही तोवर आम्ही आंदोलन करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

दरम्यान ट्विटरला #500DeathsAtFarmersProtest हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखीलल ट्विट केलं असून शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आपली शेती व देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरत आहेत. पण ते घाबरलेले नाहीत नाहीत आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधी मे महिन्याच्या अखेरीस आंदोलनकर्त्या आणि दिल्लीच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सहा महिने झाल्यानिमित्त काळा दिवस पाळला होता.