उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, बसपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जास्तीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व पक्ष विविध प्रकारे प्रयत्न करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील मैदानात उतरल्या असून, त्या उत्तर प्रदेशमधील गावं आणि शहरांमधून तब्बल १२ हजार किलोमीटरची यात्रा करणार आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या तयारीचा प्रियंका गांधी आपल्या दोन दिवसीय लखनऊ दौऱ्यात आढावा घेत आहेत. शिवाय, निवडणुकीसाठीच्या रणनितीवर चर्चा देखील करत आहेत.

mohan bhagwat
“मतदान हा केवळ आपला अधिकार नसून…”, RSS प्रमुख मोहन भागवतांनी नागपुरात बजावला हक्क
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्यासाठी १२ हजार किलोमीटरची ‘हम वचन निभाएंगे’ ही प्रतिज्ञा यात्रा काढली जाईल. यामुळे पक्ष प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जाऊ शकेल. ही यात्रा उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मोठं गाव व खेड्यांमधून जाईल. या यात्रेची रुपरेषा देखील निश्चित केली गेली आहे. आता यात्रेचा नेमका मार्ग कसा असेल आणि अन्य मुद्य्यांवर चर्चा केली जात आहे.