पीटीआय, नवी दिल्ली : ‘महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयांनी संवेदनशील असणे अपेक्षित आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पतीच्या क्रूर वर्तनामुळे महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला दोषी ठरवले होते.  त्या निर्णयाला या व्यक्तीसह त्याच्या आईने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. ती फेटाळताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले, की न्यायालयांनी तपास प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी, निष्काळजीपणे केलेला तपास किंवा पुराव्यातील विसंगतींचा फायदा उठवण्याची संधी गुन्हेगारांना देऊ नये. कारण गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही तर, पीडितांची घोर निराशा होईल. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि प्रशांतकुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिलेल्या या निकालात नमूद केले, की न्यायालयांकडून महिलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी दाखल खटल्यांबाबत संवेदनशील असावे, अशी अपेक्षा आहे.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
Image of the Bombay High Court building or a related graphic
“सरासरी बुद्धिमत्ता असलेल्या स्रीला आई होण्याचा अधिकार नाही का?”, मुलीचा गर्भपात करण्याची मागणी करणार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

 मार्च २०१४ रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या दोन दोषींच्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. २००७ मध्ये एका विवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिचा पती बलवीर सिंह आणि तिच्या सासूला दोषी ठरवण्यात आले होते.

Story img Loader