करोना कालावधीमध्ये जवळजवळ १ लाख ५० हजार मुलांच्या डोक्यावरील आई-वडीलांचं छत्र हरपलं आहे. या मुलांच्या आई किंवा वडिलांचं किंवा दोघांचंही निधन झाल्याने ती अनाथ झाल्याची माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं आहे. १ एप्रिल २०२० पासून ११ जानेवारी २०२२ पर्यंत देशातील १ लाख ४७ हजार मुलांनी करोना किंवा अन्य कारणामुळे आपल्या आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावलं आहे, असं आयोगाने म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीपीसीआरने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करोना कालावधीमध्ये ११ जानेवारीपर्यंत १० हजार ९४ मुलं पूर्णपणे अनाथ झाल्याचं म्हटलंय. तर १ लाख ३६ हजार ९१० अशी मुलं आहेत ज्यांच्या आईचं किंवा वडीलांचं या कालावधीमध्ये निधन झालंय. तसेच ४८८ मुलं पालकांनी सोडून दिलेली आढळून आल्याचंही एनसीपीसीआरने म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid orphans in india ncpcr data given to supreme court scsg
First published on: 18-01-2022 at 11:44 IST