नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अदानी प्रकरणावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज सुरू होताच काही मिनिटांमध्ये सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

सकाळच्या सत्रामध्ये लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी समूहाच्या लाचखोरी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळत कामकाज चालवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अंतर्गत अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. मात्र, अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल झाला असून त्यावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, असे सभापती जगदीप धनखड यांनी केले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूूब करण्यात आले.

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Varsha Gaikwad
Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

हेही वाचा >>>Prime Minister Narendra Modi: नाकारले गेलेल्यांकडून संसदेत हुल्लडबाजी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांवर टीकास्त्र

लोकसभाध्यक्षांची गटनेत्यांशी चर्चा

पहिल्याच दिवशी सभागृह तहकूब करावे लागल्यानंतर बिर्ला यांनी तातडीने लोकसभेतील गटनेत्यांची बैठक घेतली. अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते. पण, गदारोळामुळे कोणतीही सकारात्मक चर्चा होत नाही. त्यामुळे विरोधकांनी सभागृह चालवण्यासाठी सहकार्य करावे. सभागृहात घोषणाबाजी वा फलकबाजी करू नये, असे आवाहन बिर्ला यांनी केले.

Story img Loader