भारताने सोमवारी बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी ढाक्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. बांगलादेशबरोबर आपल्याला सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर लाभदायक संबंध हवे आहेत असे मिस्राी यांनी या वेळी स्पष्ट केले. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना द्विपक्षीय आढावा घेण्याची संधी मिळाली असे त्यांनी सांगितले.

शेख हसीना यांच्याविरोधातील बंडानंतर त्या सत्ता सोडून ५ ऑगस्टपासून भारतात राहत आहेत. त्याशिवाय बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्याही घटना घडल्या आहेत. तेथील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना गेल्या महिन्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांच्या सुटकेची मागणी करत भारतामध्ये हिंदुत्ववादी संघटना निदर्शने करत आहेत. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर विक्रम मिस्राी हे त्या देशाला भेट देणारे पहिले उच्चस्तरीय अधिकारी आहेत.

raveena tandon on saif ali khan attacked
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ramdas Athawale On Saif Ali Khan Attack
Ramdas Athawale : “मुंबई पोलिसांना सक्त सूचना…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले

हे ही वाचा… महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जाशिम उद्दिन यांच्याबरोबर आपली स्पष्ट, पूर्वग्रहरहित आणि रचनात्मक चर्चा झाली असे विक्रम मिस्राी यांनी सांगितले. ‘‘द्विपक्षीय संबंध जनतेला केंद्रस्थानी ठेवून आहेत, त्याचा सर्वांना फायदा होतो हे पाहिले आहे आणि भविष्यातही हे संबंध कायम ठेवावेत असे आम्हाला वाटते,’’ असे मिस्राी म्हणाले.

अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण याबद्दल, इतर मुद्द्यांबद्दल आम्हाला वाटणारी चिंता मी त्यांच्या कानावर घातली. तसेच सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक मालमत्तांवर झालेल्या हल्ल्यांसंबंधी खेदजनक घटनांवरही आम्ही चर्चा केली. – विक्रम मिस्राी, परराष्ट्र सचिव

अंतर्गत बाबींत हस्तक्षेप नको : बांग्लादेश

भारताने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांच्या खेदजनक घटनांचा दाखला बैठकीत दिला. परंतु या घटना भ्रामक आणि खोट्या असल्याचे सांगत, कोणत्याही देशाने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असे बांगलादेशने म्हटले आहे. दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, भारतातील ‘नकारात्मक मोहीम’ थांबवण्यासाठी भारताच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षा बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दिन यांनी ठेवली आहे.

Story img Loader