मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची हाक दिली. त्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथेही रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.तामिळनाडूतील थिरुपूर येथे भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांनी रस्त्यावर बसून आपला निषेध व्यक्त केला.बिहारच्या सितामंढी येथे वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्र येत नव्या कृषी कायद्यांना विरोध केला. तसेच आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला.राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एम आय रोडवरील शहीद स्मारकाजवळही भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.मागील काही दिवस चर्चेत असलेल्या हरियाणाच्या कर्नाळ जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देखील नागरिक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. यावेळी महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.पंजाबमधील चंदीगड - भटिंडा - अबोहर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको करत आंदोलन केलं. तसेच भारत बंदला आपला पाठिंबा दर्शवला.तामिळनाडूतील पोल्लाची येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली तसेच कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी भारत बंदला पाठिंबा देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. जळगावमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होत शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.अमृतसरमध्ये विविधी विद्यार्थी संघटना आणि शेतकरी संघटनांनी आंदोलन करत जीएनडीयू विद्यापीठाचं गेट अडवत आंदोलन केलं.