2 women marry each other: नवऱ्याच्या सततच्या व्यसनाधीनतेला कंटाळलेल्या दोन महिलांनी आपापले घर सोडून एकमेकींशी लग्न केल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे घडला आहे. कविता आणि गुंज अशी दोघींची नावे असून देवरिया येथील छोटी काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिव मंदिरात दोघींनीही एकमेकींशी लग्नगाठ बांधली. यावेळी गुंजने नवऱ्याची भूमिका साकारात कवितेला सिंदूर लावले आणि मग दोघींनी एकमेकांना हार घालून सात फेरे घेऊन विधीवत लग्न केले.

या दोनही महिला त्यांच्या नवऱ्याच्या व्यसनाधीनता आणि सततच्या छळाला कंटाळल्या होत्या. सहा वर्षांपूर्वी दोघींची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी घर सोडून एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. दोघींनाही पतीकडून कौटुंबिक अत्याचाराचा सामना करावा लागला, अशी माहिती समोर येत आहे.

Groom walks through traffic to chase his Barat
लग्नाची वरात गेली निघून अन् नवरदेव अडकला वाहतूक कोंडीत….पुढे काय झाले? पाहा Viral Video
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
jalna inter religious marriage news in marathi
साखळदंडाने बांधलेल्या विवाहितेची मुलासह मुक्तता, आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग
Gujarat wedding over food
Gujarat : लग्नात भासली जेवणाची कमतरता, मुलाच्या कुटुंबीयांनी थांबवला विवाह, वधूने पोलिसांना बोलावलं अन् पुढे घडलं असं की…
5995 couples got divorced in seven years from 2018 to 2024 in nagpur
नागपुरात रोज होतात दोन घटस्फोट! काय आहे कारण…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”

नवऱ्याच्या रोजच्या अत्याचाराला आम्ही कंटाळलो होतो. दोघींपैकी एकीला चार मुले आहेत. तिने अत्याचाराला कंटाळून माहेर गाठले होते. तर दुसरी महिलाही नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळली होती. तिच्यावर सतत व्याभिचाराचे आरोप नवरा करत होता, असे तिने सांगितले.

गुंजने पीटीआयशी बोलताना सांगितले की, आम्ही नवऱ्याच्या व्यसन आणि छळाला कंटाळलो होतो. यापुढे आम्हाला आमचे आयुष्य शांतपणे आणि आनंदात घालवायचे आहे. आम्ही आता गोरखपूर येथे एकत्र राहणार असून जगण्यासाठी इथेच काम करणार आहोत. गोरखपूरमध्ये आमचे घर नाही, पण भाड्याने राहून आम्ही पुढचे आयुष्य व्यतित करू.

शिव मंदिराचे पुजारी उमाशंकर पांडे यांनी सांगितले की, दोन्ही महिलांनी लग्नासाठीचे साहित्य स्वतःबरोबर आणले होते. त्यांनी विधी पूर्ण केल्या आणि त्या दोघी निघून गेल्या.

Story img Loader