Kerala Fire Breaking News: दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात. विक्रीसाठीचे फटाके सुरक्षित ठिकाणी रचून ठेवले जातात. पण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फटाके एका ठिकाणी ठेवले असताना त्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. केरळमध्ये अशीच एक दुर्घटना घडली असून त्यात तब्बल १५० व्यक्ती जखमी झाल्या आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार केरळच्या नीलेश्वरम भागात घडला. या भागातील वीरारकवू मंदिर महोत्सवात आतिषबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके मागवण्यात आले होते. मंदिर परिसरातच एका बाजूला हे फटाके रचून ठेवले होते. पण याच ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी मध्यरात्री ही आग लागली. महोत्सव असल्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या संख्येनं भाविक जमा झाले होते. या आगीमुळे तब्बल १५० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू भागातील रुग्णालयांत उपचार चालू आहेत.

Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Indian Army dog Phantom
Jammu Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा ‘फँटम’ श्वान शहीद; लष्काराकडून हळहळ व्यक्त
us presidential election
ट्रम्प यांच्या रॅलीतून वांशिक टिप्पणी, हॅरिस समर्थकांकडून निषेध; अध्यक्षपद निवडणूक अखेरच्या टप्प्यात
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून पोलीस पथकासह स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. या दुर्घटनेसाठी नेमकं काय कारण ठरलं, याबाबत सध्या तपास चालू आहे.

Story img Loader