बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एका कुटुंबातील ५ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पती, पत्नीसह आई, आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज झा (४२ वर्षे), त्यांची पत्नी सुंदरमणी देवी (३८ वर्षे), आई सीता देवी (६५ वर्षे), मुले सत्यम (१० वर्षे) आणि शिवम (७ वर्षे) हे मढ येथे राहत होते. रविवारी सकाळी कुटुंबातील कोणीही घराबाहेर आले नसल्यामुळे शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, त्यांना या ५ जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.