Pandit Vishnu Rajoria on 4 Children: मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण जोडप्यांना एक अजब आवाहन केलं आहे. चार मुलांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना ते एक लाख रुपये रोख देणार आहेत. रविवारी इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना राजोरिया यांनी ही घोषणा केली. ‘सध्या जोडप्यांचा कल एकच मुल जन्माला घालण्याकडे असतो, पण सनातन धर्माच्या रक्षणासाठी चार मुलांना जन्म घालावा’, अशी अपेक्षा राजोरिया यांनी यावेळी व्यक्त केली.

कॅबिनेट दर्जा प्राप्त असणारे राजोरिया म्हणाले की, परशुराम कल्याण मंडळाचा अध्यक्ष असलो तरी एक लाख रुपये रोख देण्याचा निर्णय मी माझ्या वैयक्तिक पातळीवर जाहीर करत आहे. या कार्यक्रमानंतर इंडिया टुडेशी बोलताना राजोरिया म्हणाले की, ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म देणे आता काळाची गरज आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी हे करावेच लागेल.

Pension scheme for gig workers on Ola, Uber, Swiggy platforms
ओला,उबर, स्विगी मंचावरील गिग कामगारांसाठी पेन्शन योजना; कशी असेल वेतन योजना, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
do you see the richest mother in the world
Video : जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? असे मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आली पाहिजे; महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Kerala Health, Women and Child Welfare Minister Veena George posted the video of the boy’s request on her Facebook page. (Image Credit: Facebook/Veena George)
Kerala News : “उपमा नको चिकन फ्राय किंवा बिर्याणी हवी”; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर आता अंगणवाडी आहारात येणार वैविध्य, ‘या’ राज्याचा निर्णय
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Baby Girl Sharing food with Dad
‘म्हणून लेकीला घरची लक्ष्मी म्हणतात…’ उपाशी बापासाठी चिमुकलीने केलं असं काही की… VIDEO पाहून डोळे पाणावतील

हे वाचा >> Yograj Singh: हिंदी ही ‘बायकी’ भाषा, बायकांना अधिकार देऊ नका; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा बरळले

विष्णू राजोरिया पुढे म्हणाले, “युवक तक्रार करतात की, शिक्षण महाग झाले आहे. त्यामुळे युवा जोडपे एकाच मुलाला जन्म देऊन थांबतात. पण यामुळे अनेक अडचणी उत्पन्न होत आहेत. मी तरुण जोडप्यांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी कसेतरी दिवस काढावेत. पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नये. ज्येष्ठांकडून तर काही अपेक्षा ठेवू शकत नाही. म्हणून मी तरुण जोडप्यांना आवाहन करत आहे. तरुणच आपल्या पुढच्या पिढ्यांचे संरक्षण करू शकतात, त्यामुळं त्यांनी चार मुलांना जन्म घालावा.”

या विधानाबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी केलेले आवाहन व्यक्तिगत पातळीवर आहे. त्याचा परशुराम कल्याण मंडळाशी काही संबंध नाही. मी एका सामाजिक कार्यक्रमात हे बोललो आहे. माझे विधान सामाजिक आहे. ब्राह्मण समाजातील मुलांना शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हा विश्वास दिला गेला पाहीजे.

दरम्यान काँग्रेसचे नेते मुकेश नायक यांनी मात्र राजोरिया यांनी आपल्या विधानाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. “ते एक विद्वान व्यक्ती असून माझे मित्र आहेत. लोकसंख्येची भरमसाठ वाढ हा जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. जेवढी कमी लोकसंख्या असेल, तेवढ्या अधिक शैक्षणिक सुविधा देता येतील. मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल, असा भ्रामक विचार पसरवला जात आहे.

दुसरीकडे भाजपानं मात्र राजोरिया यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, भाजपा सरकार नियम आणि संविधानानुसार काम करत आहे. राजोरिया जे काही म्हणाले, ते त्यांचे व्यक्तिगत मत होते. मुलांना जन्म देणे हा सर्वस्वी निर्णय जोडप्यांचा असतो. पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही.

Story img Loader