संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जण प्रवास करत असलेले एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर हे प्रगत असे लष्करी वाहतूक हेलिकॉप्टर असून, ते २०१२ पासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहे.

रशियन हेलिकॉप्टर कंपनी कझानने उत्पादन केलेल्या या हेलिकॉप्टरवर हवामानविषयक रडार असून ते रात्रीही पाहता येणाऱ्या (नाइट व्हिजन) उपकरणांसह सज्ज आहे.

pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
blue pebble and radiowalla ipo will open at the end of the month
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ

या हेलिकॉप्टरमध्ये नवी पीकेव्ही-८ ऑटोपायलट यंत्रणा आणि केएनईआय-८ अ‍ॅव्हिऑनिक्स सूट आहे.

मानवीय आणि आपदा मदत मोहिमांसाठी, तसेच वाहतुकीसाठी वापरला जाणारा आपला हेलिकॉप्टरचा ताफा बळकट करण्याच्या उद्देशाने ८० एमआय१७व्ही५ हेलिकॉप्टर त्यात समाविष्ट करण्यासाठी भारताने २००८ साली रशियाशी करार केला होता. हा करार नंतर १५१ हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी विस्तारित करण्यात आला. या हेलिकॉप्टर्सची पहिली तुकडी सप्टेंबर २०११ मध्ये भारतात आली.

फेब्रुवारी २०१२ मध्ये फौजा आणि सामान उंचावरील भागांत वाहून नेण्याच्या आपल्या क्षमतेत वाढ करण्यासाठी भारतीय हवाई दलाने एमआय१७व्ही५ हेलिकॉप्टर्र्स औपचारिकरीत्या आपल्या ताफ्यात समाविष्ट केली. या हेलिकॉप्टरमध्ये क्षेपणास्त्रांविरुद्ध स्वसंरक्षण यंत्रणा, शस्त्रसज्ज कॉकपिट, महत्त्वाच्या यंत्रणा व घटक बसवण्यात आले आहेत.

असाधारण धैर्य आणि सेवा

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री   :  संरक्षण दल प्रमुख जनरल रावत, त्यांची पत्नी व सशस्त्र दलाचे ११ कर्मचारी यांच्या अपघाती मृत्यूमुळे मला अतीव दु:ख झाले आहे. जनरल रावत यांनी असाधारण धैर्य आणि परिश्रम यांसह त्यांनी देशाची सेवा केली. रावत यांच्या अकाली मृत्यूमुळे सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.