उत्तर प्रदेशातील निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका वाढू लागली आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या चंद्रगुप्त यांच्यावरील वक्तव्यावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यातच आता एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका करत हिंदुत्व हा केवळ खोट्या इतिहासाचा कारखाना असल्याचे म्हटले आहे. ओवेसी म्हणाले, “हे आणखी एक उदाहरण आहे की आपल्याला चांगल्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेची गरज का आहे. हिंदुत्व हा खोट्या इतिहासाचा कारखाना आहे. चंद्रगुप्त आणि सिकंदर युद्धात कधीच भेटले नाहीत. हे आणखी एक उदाहरण आहे की आपल्याला चांगल्या सार्वजनिक शिक्षण पद्धतीची गरज आहे. चांगल्या शाळा नसल्यामुळे योगींना त्यांच्या सोयीनुसार नवनव्या गोष्टी रचायला मिळतात. योगीबाबा शिक्षणाला महत्त्व देत नाहीत, हेच त्यांनी दाखवून दिलंय, असं म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला. लखनऊमध्ये एका सामाजिक प्रतिनिधी परिषदेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले होते, भारतीय इतिहासाकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “इतिहासाचा विपर्यास कसा होतो! इतिहासाने चंद्रगुप्त मौर्याला महान म्हटले नाही, कोणाला महान म्हटले? जो त्याच्यापासून हरला त्या सिकंदरला महान म्हणतात. देशाची फसवणूक झाली आहे. पण इतिहासकार यावर मौन बाळगून आहेत, कारण सत्य भारतीयांसमोर आले तर समाज पुन्हा एकदा उभा राहील. जर, समाज उभा राहिला तर देशही उभा राहील. पंतप्रधान मोदी आज या देशाची उभारणी करत आहेत. जेव्हा आपण म्हणतो, 'एक भारत, श्रेष्ठ भारत' तेव्हा हे मुद्दे हाताळले जातात.” गौतम बुद्धांनी कधीही जगावर युद्ध लादले नाही – योगी आदित्यनाथ