भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीगीर महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना या पदावरुन हटवण्याचीही मागणी केली आहे. २८ मे रोजी म्हणजेच जेव्हा नव्या संसदेचं उद्घाटन होतं त्यादिवशी या सगळ्यांनी मार्च काढण्याचंही ठरवलं पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आम्ही आमची पदकं गंगा नदीत विसर्जित करु अशी भूमिका या पैलवानांनी घेतली. मात्र त्यांना शेतकरी नेत्यांनी अडवलं. आता या सगळ्यावर बृजभूषण शरण सिंह यांचं वक्तव्य समोर आलं आहे. गंगेत मेडल्स विसर्जित केल्याने मला फाशी होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे बृजभूषण शरण सिंह?
बृजभूषण सिंह म्हणाले की कलियुग आहे काहीही होऊ शकतं म्हणून मी लढतो आहे. रामाला वनवास झाला नसता तर इतिहास घडला असता का? रामाला जो वनवास झाला त्याचं श्रेय कैकयी आणि मंथरा यांना दिलं गेलं पाहिजे. माझी या कुस्तीगीरांशी काहीही दुश्मनी नाही, कुठलंही वैर नाही. यांच्या यशात माझा वाटा आहे. आंदोलनाला बसण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मला देव मानत होते. माझ्या कार्यकाळात जी टीम १८ व्या क्रमांकावर होती ती टॉप फाईव्हमध्ये आली. ऑलिम्पिकच्या सात पदकांपैकी पाच मी अध्यक्ष झाल्यापासूनच्या कार्यकाळात आले. आता मला आणखी मोठं काम करायचं आहे.
१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा काँग्रेस
गंगेत पदकं विसर्जित करायला गेले होते पैलवान
बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर आता कुस्तीगीर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंगळवारी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक हे तिघेही हरिद्वारला गेले होते. तिथे गंगा नदीत ते तिघेही त्यांची मेडल्स विसर्जित करणार होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत त्या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर आता या पैलवानांनी सरकारला बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I wont be hanged by immersing medals in ganga river do not do emotional drama said brijbhushan sharan singh scj