भारतात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. अनेक ठिकाणी या भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहे. परिणामी भटक्या कुत्र्यांना मारण्याबाबत विविध संस्थांनी आदेश दिले होते. या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विशेषत: केरळ आणि मुंबईत भटके कुत्रे धोकादायक बनले आहेत. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी घेण्यात येत आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या बेंट यांनी भटक्या कुत्र्यांबाबत महत्वपूर्ण सूचना दिली आहे.

कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना अन्न देणारे जबाबदार

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना अन्न देणारे जबाबदार असतील. तसेच या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर तोडगा काढण्याच्या गरजेवर भर देत भटक्या कुत्र्यांना नियमितपणे खायला घालणाऱ्या लोकांना श्वानांच्या लसीकरणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते, असेही म्हणले आहे.

हेही वाचा- हरियाणात गणपती विसर्जनादरम्यान सात जणांचा बुडून मृत्यू, चार जण जखमी

लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यांच्यात समतोल राखण्याचे आदेश

एवढचं नाही तर भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्यास या कुत्र्यांना अन्न देणाऱ्या व्यक्तींनाचं उपचाराचा खर्च उचलावा लागेल, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. तसेच लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यांच्यात समतोल राखण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, आपल्यापैकी बहुतेकजण श्वानप्रेमी आहेत. मी कुत्र्यांना अन्न देतो. पण माणसांनी श्वानांची काळजी घेतली पाहिजे. . भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तर्कशुद्ध तोडगा काढला पाहिजे, असेही न्यायमूर्ती खन्ना म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले. सोबतच या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

भारतात २०१९ पासून १.५ कोटी पेक्षा जास्त प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेश (२७ लाख ५२ हजार २१८) त्यानंतर तामिळनाडू (२० लाख ७० हजार ९२१), महाराष्ट्र (१५ लाख ७५ हजार ६०६) आणि पश्चिम बंगालमध्ये(१२लाख ०९ हजार २३२) प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दुसरीकडे, लक्षद्वीपमध्ये भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या कोणत्याही घटनांची नोंद नाही.

हेही वाचा- दिल्लीत ‘लम्पी स्किन’ आजाराने प्रशासनाची चिंता वाढवली, सरकारने बोलावली तातडीची बैठक

भारतात दरवर्षी १०० हून अधिक रेबीज प्रकरणे आणि मृत्यूची नोंद

२०१९ मध्ये ७२ लाख ७७ हजार ५२३ प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर २०२० मध्ये ४६ लाख ३३ हजार ४९३ घटनांची नोंद करण्यात आली. तर २०२१ मध्ये १७ लाख ०१ हजार १३३ घटनांची नोंद करण्यात आली. २०२२ सालाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये १४.५ लाखांहून अधिक लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. यावर्षी भटक्या कुत्र्यांनी माणसांना चावल्याची सर्वाधिक प्रकरणे तमिळनाडूमध्ये नोंदवण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रात २ लाख ३१ हजार ५३१ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. भारतात दरवर्षी १०० हून अधिक रेबीज प्रकरणे आणि मृत्यूची नोंद होते.

पाळीव कुत्र्यांपेक्षा भटक्यां कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना अधिक

पाळीव कुत्र्यांपेक्षा भटक्यां कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना अधिक आहेत. २०१९ च्या गणनेनुसार, भारतात १ कोटी ५३ लाख ०९ हजार ३५५ भटके कुत्र्यांची नोंद करण्यात आली होती. उत्तर प्रदेश (२०लाख ५९हजार २६१), ओडिशा (१७लाख ३४ हजार ३९९) आणि महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. (१२ लाख ७६ हजार ३९९). मणिपूर, लक्षद्वीप आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये शून्य भटक्या कुत्र्यांची नोंद झाली आहे