राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जम्मू-काश्मीरच्या बजेटवरून मोदी सरकारवर टीका केली. सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही, असा आरोप सुळे यांनी केला. गेल्या ६० वर्षांत जे घडलं ते घडलं, पण पुढची किती वर्षे तुम्ही तेच बोलणार आहात. तेच ते ऐकून आता कंटाळा आलाय, असं सुप्रिया सुळे आज संसदेत बोलताना म्हणाल्या. लोकसभेत जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे लोकसभेत बोलताना केंद्र सरकारला म्हणाल्या की, “तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल वाईट वाटत असेल, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा. नेहमीच गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही. तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत. झालं ते सोडून देत तुम्ही का त्यांना मदत करत नाही. एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्यांला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही,” असं उदाहरण देत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुनावलं. तसेच सरकारनं भूतकाळात न जगता वर्तमान काळात जगावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

Video: “आई-बाप काढायचे नाहीत”; सुप्रिया सुळेंनी संसदेतच मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्याला सुनावलं

केंद्र सरकारने काश्मिरी लोकांना हजारो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, मात्र त्याबद्दल काहीही झाले नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच काश्मिरी पंडितांसाठी ते काय करणार आहेत हे सरकारने सांगावे आणि त्यांच्या भविष्यावर चर्चा करावी, भाजपाच्या सदस्यांनी केंद्रशासित प्रदेशात जाऊन वास्तविकता जाणून घ्यावी, असेही त्या म्हणाल्या. जम्मू आणि काश्मीरमधील जीडीपी आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी हा अयशस्वी प्रकल्प असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.