मोबाईल हरवणे म्हणजे हल्ली अनेकांना अपंग झाल्यासारखे वाटते. कधी प्रवासात किंवा इतर कुठे हा मोबाईल चोरीला जातो तर कधी आपणच तो कुठेतरी विसरतो. एकतर आपला सगळा डेटा गेल्यामुळे आणि महागाचा मोबाईल गहाळ झाल्यामुळे आपल्याला सुरुवातीला धक्का बसलेला असतो. मग पोलिसांकडे तक्रार करणे आणि मोबाईल सापडविण्याचा प्रयत्न कऱणे असे उपाय केले जातात. मग तेही यशस्वी न झाल्यास आपण शोधाशोधी करण्याचा नाद सोडून देतो आणि नवीन मोबाईल घेण्याचा विचार करतो. पण मोबाईल शोधण्यासाठी नेमकी काहीतरी यंत्रणा असायला हवी यावर मागच्या काही काळापासून विचार सुरु होता. हाच आता प्रत्यक्षात आला असून आता एका डायलवर तुमचा हरवलेला मोबाईल तुम्हाला मिळू शकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामार्फत हरवलेला मोबाईल मिळण्याबरोबरच त्या फोनचा वापर करुन कोणी गैरफायदा घेऊ नये याची खात्री करणे सोपे होणार आहे. सरकारकडून एक सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार, हरवेलेल्या फोनचा आयएमईआय नंबर आणि मोबाईलशी निगडीत सर्व माहिती मिळू शकेल. तक्रारीनंतर हा फोन कोणत्याही नेटवर्कवर काम करणार नाही. मात्र पोलीस विशिष्ट यंत्रणेद्वारे फोनच्या लोकेशनपर्यंत पोहचू शकतील. दूरसंचार विभागाकडून येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If your mobile lost you can complain by dialing one number government initiative
First published on: 23-05-2018 at 15:49 IST