उत्तरप्रदेश पोलिसांना सोमवारी संध्याकाळी उन्नावमधल्या एका जोडप्याचे मृतदेह शेतामध्ये सापडले होते. उन्नाव पोलिसांनी ह्या हत्या ऑनर किलींगच्या उद्देशाने केल्याचा दावा केला होता. आता या दोन्ही हत्या नक्की कशामुळे झाल्या, ह्या हत्यांचं गूढ कसं उलगडलं ही माहिती समोर आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांना १९ ऑक्टोबर रोजी उन्नावमधील शेतातून एका जोडप्याचे मृतदेह सापडले होते. उन्नाव पोलिसांनी ही हत्या ऑनर किलिंग असल्याचा दावा केला आहे. उन्नावचे पोलीस अधीक्षक (एसपी) अविनाश पांडे म्हणाले, “आम्ही मुलीच्या वडिलांना आणि तिच्या चुलत भावाला हत्येमध्ये सहभागी केल्याबद्दल अटक केली आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, 19 ऑक्टोबर रोजी गावात एक कुत्रा मानवी हात तोंडात धरुन फिरताना आढळल्याने भिखारीपूर गावातील लोक हादरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली आणि त्यांची चौकशी सुरू केली. उन्नावचे एसपी पांडे म्हणाले, “मानवी हात सापडल्यानंतर आम्ही शोध मोहीम सुरू केली. आमच्या टीमला गावातील राम सिंह यांच्या शेतातून एक मुलगा आणि एका मुलीचा मृतदेह सापडला. एसपी पुढे म्हणाले की तपासादरम्यान पथकाला कळले की मृत दोघेही गावातील रहिवासी आहेत आणि त्यांचे नातेसंबंध होते. पुरूषाच्या मृतदेहाची ओळख राम सिंहचा मुलगा बालकृष्ण आणि सरला म्हणून महिलेची ओळख पटली.उन्नाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकृष्णाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांसह इतर अनेकांविरोधात तक्रार दाखल केली होती. स्थानिक पोलिसांनी पुढे सांगितले की सरलाचे वडील आणि इतर अनेक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. “चौकशीदरम्यान, मुलीच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली,” एसपी पुढे म्हणाले. एसपींनी माध्यमांना सांगितले की, मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की १२ ऑक्टोबरच्या रात्री त्यांची मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे आढळले. त्यांनी नातेवाईकांसह शोधमोहीम सुरू केली. “सरलाच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की त्यांना त्यांची मुलगी आणि बाळकृष्ण शारिरीक संबंध करत असताना आढळून आले. सरलाच्या वडिलांनी आणि काकांनी बाळकृष्णवर काठ्यांनी हल्ला केला आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. जेव्हा मुलीने तिच्या वडिलांना धमकी दिली की ती हत्येबद्दल गावकऱ्यांना सांगेल, तेव्हा तिचाही गळा दाबून खून करण्यात आला,” एसपी पुढे म्हणाले.