पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी हे एअर स्ट्राईक झाले. त्यात अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांचे हे तळ होते. भारतानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. पण या संपूर्ण कारवाईमध्ये ‘मनोवैज्ञानिक रणनीती’ हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरला!

मनोवैज्ञानिक रणनीतीचा वापर जसा भारतीय लष्कराकडून केला जातो, तसाच पाकिस्तानकडूनदेखील केला जातो. अशावेळी त्या रणनीतीला बळी न पडण्यासाठी सामान्य भारतीयांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे?