सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. यामुळे तिथे जवळपास हजारो भारतीय नागरिक अडकले आहेत. या गृहयुद्धातून आपल्या भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याकरता भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत ट्वीट केलं असून सुमारे ५०० भारतीय सुदान बंदरावर पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले.

“सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. सुमारे ५०० भारतीय सुदा बंदरावर पोहोचले आहेत. काही भारतीय या मार्गावर आहेत. आमची जहाजे आणि विमाने भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सज्ज आहेत. सुदानमधील आमच्या सर्व बांधवांना मदत करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत”, असं ट्वीट जयशंकर यांनी केलं आहे.

N 11 vulture released from Tadoba project reached Tamil Nadu after traveling 4000 kms but was electrocuted and died
चार हजार कि.मी. उड्डाण, पाच राज्यांतून प्रवास; तामिळनाडूत घेतला अखेरचा श्वास…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Security forces managed to kill 12 Naxalites in an encounter on border of Bijapur Sukma district in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; बस्तर सीमा भागात सुरक्षा यंत्रणेसोबत…
Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस

सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी वायुसेनेचे दोन सी-१३० विमान आणि आयएनएस सुमेधा जहाज सौदी अरेबिया आणि सुदानमध्ये पोहोचले आहेत. वायुसेनेचे जहाज सौदी अरेबियाच्या हद्दीत तैनात आहेत. तर, आयएनएसचे सुमेधा जहाज सुदानच्या बंदरगाह येथे पोहोचले आहे.

हेही वाचा >> सुदान संघर्षातून तीन हजार भारतीय नागरिकांची अजूनही सुटका नाही; सध्याच्या परिस्थितीची माहिती जाणून घ्या!

सुदानमधील परिस्थिती चिघळत असल्याने तेथील परदेशी नागरिक आपआपल्या मायदेशी परतत आहेत. विविध देशातील १५० हून अधिक नागरिक शनिवारी सौदी अरेबियात पोहोचले. भारतातील फ्रान्सच्या दूतावासाने ट्वीट करत म्हटलं की, काल रात्री दोन लष्करी विमानांनी भारतीय नागरिकांसह २८ देशांतील ३८८ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

परिस्थिती चिघळली

या संघर्षामुळे तीन हजार भारतीय नागरिक सुदानच्या विविध भागांत अडकले आहेत. तर केरळचे रहिवासी अल्बर्ट ऑगस्टिन (४८) यांचा सुदानमधील गोळीबारात दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. सुदानी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यात अजूनही तोडगा निघण्याचा मार्ग दिसत नाही. यामुळे हे गृहयुद्ध आणखी भडकण्याची चिन्ह दिसत आहेत. सैन्यदलाचे प्रमुख आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष जनरल अब्देल फत्ताह अल-बुऱ्हान यांनी अल् अरेबिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, सर्व योद्ध्यांनी सुदानी नागरिक म्हणून एकत्र बसायला हवे आणि सुदानची आशा आणि जीवन पुन्हा पल्लवित करण्यासाठी योग्य मार्ग काढला पाहिजे. या युद्धामुळे प्रत्येकाचे नुकसानच होणार आहे.

सुदानमधील संघर्ष कशामुळे झाला?

सुदानमध्ये शक्तिशाली अशा निमलष्करी दलाची स्थापना २०१३ रोजी झाली होती. यात मुख्यतः जंजावीड मिलितीस यांचा समावेश आहे, ज्यांनी २००० साली दार्फर युद्धात सुदान सरकारतर्फे सहभाग घेतला होता. निमलष्करी दलाचे नेतृत्व जनरल मोहम्मद हमदान डगलो यांच्याकडे आहे. ज्यांना हेमेदती असेही म्हटले जाते. त्यांच्यावर मानवाधिकारांचे हनन केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.

सुदानमधील भारतीयांसाठी MEA नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

फोन: 1800 11 8797 (टोल फ्री)

91-11-23012113

91-11-23014104

91-11-23017905

Story img Loader