scorecardresearch

Premium

Dangri Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना गोडसेचा उल्लेख करत महबूबा मुफ्तींचं मोठं विधान, म्हणाल्या…

“…त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते”, असंही म्हणाल्या आहेत.

mehbboba mufti
(संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अप्पर डांगरी येथे नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना, अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली आहे.

राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. राजौरी पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्पर डांगरी येथे रविवारी ( १ जानेवारी ) संध्याकाळी दहशतवाद्यांनी हिंदू समुदायाच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

hamas attack on israel women deadbody paraded naked
हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!
narendra modi mohan bhagwat
समोरच्या बाकावरून : माहिती नको, आकडेवारी द्या..
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
sports minister anurag thakur cancels china trip
चीनच्या आडमुठेपणाचा भारताकडून तीव्र निषेध; अरुणाचलच्या खेळाडूंना मान्यता न दिल्याने क्रीडामंत्र्यांचा स्पर्धेस जाण्यास नकार

तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. तर, एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तसेच, शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूत नेण्यात आलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “काश्मीरसह भारत एक धर्मनिरपेक्ष ठिकाण आहे, मात्र ही गोष्ट वेगळी आहे की आता याला गोडसेचा देश बनवलं जात आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक नागरिकाची हत्या जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान आहे. अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे एक विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होत आहे.”

याशिवाय महबूबा मुफ्तींनी घटनेबद्दलम्हटले की, “ही एक हृदयद्रावक घटना आहे आणि त्या कुटुंबीयाचे मोठे नुकसान आहे. ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, ईश्वर त्यांना शक्ती देवो. अशा घटनांमध्ये एकाच पक्षाला हिंदू आणि मुस्लीम मुद्य्यांचा फायदा होतो, त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते.” असंही मुफ्तींनी म्हटलं आहे.

याचबरोबर, “जम्मू-काश्मीरचे लोक बंदुकांमध्ये अडकले आहेत. राजौरी सारखे हल्ले आणि गैरमुस्लिमांच्या हत्यांमुळे देशात एका विशिष्ट पक्षाला फायदा होत आहे. हा तो पक्ष आहे, जो लोकांचे विभाजन करतो आणि धर्माच्या नावावर द्वेष निर्माण करतो.”

या हल्ल्यात तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला . त्यामध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. तर, एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तसेच, शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूत नेण्यात आलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India including kashmir is a secular place but it is a different thing that it is being made godses nation now pdp chief mehbooba mufti msr

First published on: 02-01-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×