पीटीआय, जेरुसलेम : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान भारतीय लोक आणि मुंबईकरांचे धैर्य दिसून आले. त्या दिवशी झालेल्या अतोनात हानीतूनच भारत आणि इस्रायल यांच्यात मजबूत मैत्रिबंध निर्माण झाला, असे शनिवारी इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

२६-११ च्या हल्ल्यातून निर्माण झालेली वेदना ही भारत आणि इस्रायल यांच्यातील वेदनेचा समान धागा असून त्याने उभय देश जोडले गेल्याची भावना अनेक इस्रायली नागरिकांनी व्यक्त केली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र खात्याचे महासंचालक अलॉन उशपिझ यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, त्या भयानक दिवशी मी भारतीय लोक आणि मुंबईकरांचे धैर्य पाहिले, त्याचे मला आजही स्मरण होते. त्या दिवशी उभय देशांत निर्माण झालेल्या सहकार्याच्या बंधाचा आम्हाला अविरत लाभच होत आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मुंबई हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक ठिकाणी सभा झाल्या.

Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
Narendra Modi On Terrorist attack in Russia Moscow
रशियातील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला निषेध, म्हणाले, “भारत रशियासोबत…”