सरबजितसिंग याच्या हत्येमुळे पाकिस्तान सरकारशी सुरू असलेली संवादाची प्रक्रिया थांबविता येणार नाही, असे भाष्य केंद्रीय माहिती आणि दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी केले. तुरुंगातील कैद्याची पुरेशी काळजी घेण्यात पाक सरकार अपयशी ठरले, मात्र असे असले तरी केवळ या एका घटनेमुळे पाकशी संवाद थांबवून काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया एका प्रश्नाचे उत्तर देताना सिब्बल यांनी दिली.