India Pakistan War Tensions भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. दरम्यान यानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगनानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाली कंगना?

“आपल्या देशात युद्धस्थिती आहे. आपलं लष्कर सगळ्यांचं रक्षण करतं, तसंच देवाने लष्कराचं लक्षण केलं पाहिजे. त्यांना असंच यश मिळालं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आपल्या सगळ्यांचं मनोबल आहे. ऑपरेशन सिंदूर असं नाव या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देण्यात आलं. कारण पहलगाम हल्ल्यात आपल्या माता-भगिनींच्या समोर त्यांचे संसार दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केले. निरपराध पर्यटकांच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे आता रक्त सांडूनच या गोष्टीचा घेतला जातो आहे. देशाला या मोहिमेत यश मिळावं म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत.” असं खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने म्हटलं आहे.

८ मे रोजी केंद्र सरकारची बैठक

केंद्र सरकारने गुरुवारी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीत संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये ही बैठक होईल. या बैठकीत सर्व पक्षांना आजच्या एअर स्ट्राईकबाबत व ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली जाईल. दरम्यान भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे तीन देशांचे विदेश दौरे पुढे ढकलले आहेत. बुधवारी मोदी क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँडच्या दौऱ्या जाणार होते. आता हे दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत.

कुठल्या ९ ठिकाणांवर करण्यात आला एअर स्ट्राईक?

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. दहशतवादी तळ असलेली ही ठिकाणी पाकव्याप्त जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानातील आहेत. २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबसह ज्या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं आणि हेडली ज्यात होता तो तळही भारताने एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केला आहे.