वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असताना हा वाद अधुनमधून राजकीय पटलावर येतो. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा केला. यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि अक्कलकोट भागात बोम्मई यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. तर, काही ठिकाणी कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहण्यात आलं. यावरून बसवराज बोम्मई संतापले आहेत.

“राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणे हे संबंधित सरकारचे काम आहे. कोणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आंदोलन करत असतील, तर त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने तत्काळ कारवाई करुन हे थांबवण्याची विनंती करतो. अन्यथा यामुळे राज्यांत फूट पडण्याची शक्यता आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारी लोक आहोत,” असे बसवराज बोम्मई यांनी सांगितलं.

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

“सीमावादावर २००४ साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याविरुद्ध भविष्यात लढत राहू, ते आमचे पहिले प्राधान्य असणार आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याकडे आमचं लक्ष आहे. आमच्या सीमांचं आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे बोम्मई यांनी म्हटलं.