Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठात ९ व्या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला संबोधित केलं. या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेत हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी देखील सहभाग घेतला होता. मात्र, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या गीता परिषदेला संबोधित करताना भगवद्गीतेचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा वारसा आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी धर्मग्रंथ म्हणून केले. तसेच भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

आरिफ मोहम्मद खान यांनी काय म्हटलं?

हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठात गीता परिषदेला संबोधित करताना राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी जागतिक पर्यावरण संरक्षणात भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलं. तसेच भगवद्गीतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. तसेच गीतेत उपनिषद आणि वैदिक ग्रंथांची मूलभूत तत्त्वे असून जी भारताची एकता आणि अखंडता दर्शवतात. भगवद्गीतेमधून मानवतेचा फायदा होईल, केवळ भगवद्गीताच मानवतेचे कल्याण करेल, असं आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

Ashish Shelar On Saif Ali Khan Attack
Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”

हेही वाचा : Cash In Parliament : नरसिंह रावांपासून ते मनमोहन सिंग सरकारपर्यंत… संसदेत कधी कधी सापडली कॅश? एका नेत्याला झाला होता तुरुंगवास

तसेच आरिफ मोहम्मद खान यांनी पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गीतेच्या भूमिकेवर भर दिला आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश जगभर पसरवला गेला पाहिजे असंही म्हटलं. तसेच हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी या गीता परिषदेला संबोधित करताना गीतेचा पर्यावरण रक्षणाचा संदेश आणि मानवी जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठीचं महत्त्व अधोरेखित केलं. ‘भगवद्गीता हा सर्व मानवतेच्या कल्याणासाठी पवित्र ग्रंथ असल्याचं राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी म्हटलं.

तसेच उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी या संबोधित करताना म्हटलं की, भगवद्गीता लोकांना संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. तसेच भगवद्गीतेची शिकवण आणि हरियाणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या प्रयत्नांचीही गुरमीत सिंह यांनी प्रशंसा केली.

Story img Loader