रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी लोकसभेत २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करता सर्व सामान्यांना प्रभूंनी दिलासा दिलाच पण यासोबतच कोणत्याही मोठ्या घोषणा न करता मागील रेल्वे अर्थसंकल्पाप्रमाणेच पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे- फक्त भाडे वाढवून उत्पन्न वाढणार नाही. इतर उत्पन्नाचेही स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न यंदा रेल्वेत गुंतवणूक दुपटीने वाढवणार. २०२० पर्यंत स्वयंचलित रेल्वेफाटक करण्याचे लक्ष्य. पॅसेंजर गाड्यांचा वेग ताशी ८० किमी करण्यावर भर. सध्या दररोज १३ किमीचा रेल्वेमार्ग तयार केला जातोय. कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार. रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण करण्यावर भर. श्रीनगरला रेल्वेमार्गांनी जोडण्याचे काम लवकरच पूर्ण करणार. वाराणसी ते दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरू होणार. 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशात रेल्वेचे दोन कारखाने सुरू करणार. आता जनरल बोगीमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा. दोन वर्षांत ४०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा. ई-तिकीट दोन मिनिटात २ हजार ऐवजी ७ हजार काढता येणार. महिलांच्या २४ तास सुरक्षेसाठी सक्षम हेल्पलाईन. तिकीटाच्या रांगा कमी करण्यासाठी प्रयत्न करणार. वडोदरा रेल्वे विश्व विद्यालयाची स्थापना करणार. येत्या काळात सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रयत्नशील. ४०० स्थानकांचा विकास पीपीपी तत्त्वावर करणार. आर्थिक मंदीतही रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न. कचरा दिसल्यास तातडीने बोगीची स्वच्छता करण्याची मागणी करता येणार. स्थानिक खाद्य पदार्थ हवे असल्यास मोठ्या स्थानकांवर ते उपलब्ध होणार. प्लॅटफॉर्मच्या कुलीला यापुढे सहाय्यक म्हणून संबोधण्यात येणार. चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेलसाठी 'एलिव्हेटेड कोरिडोअर'ला प्राधान्य. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, सुरेश प्रभूंची लोकसभेत माहिती. सामान्यांसाठी अनारक्षित गाड्या सुरू करणार. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांची उंची वाढवणार. रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवता येण्याची सुविधा उपलब्ध होणार. रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार. डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करून सुधारणेवर भर. १ लाख २१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य. तीर्थस्थळ स्थानकांवरील सुविधा अधिक संपन्न करणार. रेल्वे ट्रॅकवरील आंदोलनांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान. चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्गाच्या कामाला तातडीने सुरूवात ताशी १३० किमी वेगाची तेजस रेल्वे सुरू होणार. गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबवणार. जेवणाची सोय असलेली 'हमसफर' रेल्वे सुरू करणार. रेल्वेच्या प्रवासी दरात कोणतीही वाढ नाही.