केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. सरकारने संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक व्यासपीठांवरून त्याच्याशी बोललो, पण त्यांनी मान्य केले नाही. त्यामुळे आता हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायद्यांबद्दल माफी मागितली. सरकार एका वर्षाहून अधिक काळ ते शेतकऱ्यांना समजवण्यास अपयशी ठरले असे मोदींनी म्हटले आहे. “मी देशवासीयांची मनापासून आणि मनापासून माफी मागतो. आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. आमच्या प्रयत्नांमध्ये काहीतरी उणीव राहिली असावी जी आम्ही काही शेतकर्यांना पटवून देऊ शकलो नाही,” असे मोदी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींनी केलेली घोषणा शेतकऱ्यांप्रती त्यांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते असे म्हटले आहे. “कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा आमच्या अन्नदाता, शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती त्यांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. https://twitter.com/nitin_gadkari/status/1461624969801048064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1461624969801048064%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Flive-pm-modi-announcement-of-repeal-of-all-three-agricultural-laws-abn-97-2684834%2F दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या घोषणेवरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. देशाच्या अन्नदात्याने अहंकाराचे मस्तक झुकवले, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली. तर आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू एमएसपीसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही सरकारने चर्चा करावी, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतरही हा निर्णय असाच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो असे म्हटले.