पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओदिशाच्या बालासोर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा या शतकातील सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला. या अपघातामागील सत्य बाहेर येण्यासाठी योग्य तपासाची गरजही त्यांनी व्यक्त केली. दोन वेळा रेल्वेमंत्रिपद भूषवणाऱ्या ममता यांनी घटनास्थळी भेट दिली व मदतकार्याची पाहणी केली. शनिवारी दुपारी त्या अपघातस्थळी पोहोचल्या. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee believes that the truth should be brought before the world through proper investigation amy
First published on: 04-06-2023 at 04:18 IST