Mamata Banerjee Interested to Lead INDIA bloc Samajwadi Party Suports : “विरोधकांची इंडिया आघाडी मी बनवली आहे. सध्या इंडियाची घसरण होत असली तरी मला संधी मिळाल्यास मी ‘इंडिया’चं नेतृत्व करेन आणि आघाडीला पुढे घेऊन जाईन”, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंलं आहे. एका बाजूला ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांना पाठिंबा देखील मिळू लागला आहे. इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. तर, समाजवादी पार्टीने मात्र ममता यांना पाठिंबा दर्शवला आहे. सपाने म्हटलं आहे की “ममता यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी करावं, आमचा त्यावर अजिबात आक्षेप नाही”. सपाचे नेते उदयवीर सिंह म्हणाले, “ममता बॅनर्जी या आमच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्या आहेत. त्यांचा पक्ष सातत्याने भाजपाचा विरोध करत आहे. त्यांचा पक्ष भाजपाविरोधात आक्रमकपणे लढत आहे”.

उदयवीर सिंह म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगाल व उत्तर प्रदेशने एकत्र येत महत्त्वाची भूमिका निभावली होती. आमच्या एकत्र येण्याने इंडिया आघाडीला पुढे जाण्यास मदत झाली, इंडिया आघाडी मजबूत झाली. त्यामुळे उत्तर प्रदेश व बंगालमध्ये भाजपाची पिछेहाट झाली. इंडियातील सर्व पक्षांचा पाठिंबा असेल तर आम्ही देखील ममता यांना पूर्ण पाठिंबा देऊ. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व केल्यास आमची त्यावर हरकत नसेल”.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”

हे ही वाचा >> दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की “मला संधी मिळाल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन”. दरम्यान, “मी इंडिया आघाडी बनवली होती. जे लोक या आघाडीचं नेतृत्व करत आहेत त्यांनी ही आघाडी सांभाळली पाहिजे, अधिक सक्षम केली पाहिजे”, असं म्हणत बॅनर्जी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, “जे लोक ही आघाडी सांभाळत आहेत त्यांना इतक्या पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाता येत नसेल तर त्यात मी काय करू शकते. मी फक्त एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्वांनी एकजुटीने पुढे जायला हवं”.

Story img Loader