Sambhal Violence Updates : उत्तर प्रदेशातील संभल येथे 24 नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेकजण जखमी झाले होते. यानंतर देशभरात वातावरण तापलेले आहे. अशात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने संभलमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले म्हणून, तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला आहे.

मुरादाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतपाल अंतील यांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने तक्रार केली होती. ही तक्रार आता महिला पोलीस ठाण्याला पाठवण्यात आली आहे. ते म्हणाले की, महिलेने तिच्या तक्रारीत अनेक आरोप केले आहेत. ही महिला मूळची मुरादाबादमधील कटघरची आहे.

Actor Saif injured in knife attack has successfully operated and is out of danger
Saif Ali Khan: दरोडेखोराने १ कोटी रुपये मागितले, सैफ अली खानच्या घरातील मदतनीसची पोलीस जबाबात माहिती
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
Image Of Walmik Karad
Walmik Karad : “माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला, मला न्याय कोण देणार?” पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया
Kolhapur divorce women defraud and raped by fake groom
विवाह नोंदणी संकेतस्थळावरून घटस्फोटित महिलेशी ओळख, लग्नाचे वचन देत ११ लाख रुपये लुटले; आरोपी फिरोज शेखला अटक
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप

काय आहे प्रकरण?

महिलेने तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, ती पतीच्या कार्यालयात संभल हिंसाचाराचा व्हिडिओ पाहत होती. तेव्हा तिच्या पतीने तिला असे व्हिडिओ पाहू नको असे सांगितले होते. पुढे या महिलेने तिच्या पतीला सांगितले की, संभल हिंसाचार प्रकरणात पोलिसांची भूमिका कौतुकास्पद आहे. यावर तिचा पती संतापला आणि त्याने पत्नीला तिहेरी तलाक दिला.

महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे २०१२ मध्ये मुरादाबाद येथील एका व्यक्तीशी लग्न झाले आणि २०२१ मध्ये घटस्फोट झाला. तिला तीन मुले होती. यानंतर तिची गुडगावमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीशी भेट झाली आणि त्या व्यक्तीशी तिचे नाते निर्माण झाले. महिलेचे म्हणणे आहे की, या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, परंतु नंतर तो टाळाटाळ करू लागला. जेव्हा महिलेने पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली तेव्हा या व्यक्तीने तिच्याशी लग्न केले.

हे ही वाचा : सीरियात सत्तापालटाचा प्रयत्न, अनेक शहरे बंडखोरांच्या ताब्यात; राष्ट्राध्यक्ष देशातून पळून गेले?

कसा सुरू झाला संभल हिंसाचार

न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान 24 नोव्हेंबर रोजी पाहणी पथकाने उत्खनन केल्याच्या अफवेमुळे मशिदीत गर्दी जमली. यानंतर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केली, ज्यात गोळी लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर उत्तर प्रदेशसह देशातील वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी संसदेतही याप्रकरणी आवाज उठवला होता. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी संभलला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. पण, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांना माघारी फिरावे लागले होते.

Story img Loader