UP Woman Elopes With Beggar: उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक ३६ वर्षीय महिला एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. भिकाऱ्यासह पुढील आयुष्य घालविण्यासाठी या महिलेने सहा मुलांना वाऱ्यावर सोडून पळ काढला. यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८७ नुसार गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध सुरू केला. पतीने आरोप केला की, पत्नीने पळून जात असताना घरातील पैसेही चोरून नेले आहेत.

४५ वर्षीय पतीचे नाव राजू असल्याचे सांगितले जाते. राजू हरदोई जिल्ह्यातील हरपालपूर भागात पत्नी राजेश्वरी आणि सहा मुलांसह राहत होता. राजूने दिलेल्या तक्रारीनुसार, नन्हे पंडीत नावाचा इसम त्यांच्या घराजवळ अनेकदा भीक मागण्यासाठी येत असे. पंडीत हात पाहण्याचेही काम करायचा. त्याचे आणि राजेश्वरीचे अनेकदा संवाद व्हायचा. तसेच त्यांनी एकमेकांना फोन नंबर दिला होता. फोनवरूनही ते अधूनमधून बोलायचे.

MCOCA Act should be implemented against chain thieves
शहरबात : साखळी चोरट्यांना ‘मकोका’ लावाच
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार
Crime News
नराधमाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा, पोटच्या मुलांदेखत महिलेवर बलात्कार; पती घरी येताच अ‍ॅसिड…
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप

हे वाचा >> Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

“३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राजेश्वरीने मुलगी खुशबूला सांगितले की, ती बाजारात भाजीपाला आणण्यासाठी जात आहे. जेव्हा ती वेळेत परतली नाही, तेव्हा मी तिचा सगळीकडे शोध घेतला. पण ती कुठेच आढळून आली नाही. आमची म्हैस विकल्यानंतर आलेले पैसे मी घरात ठेवले होते, हे पैसे घेऊन माझ्या पत्नीने पळ काढल्याचे माझ्या नंतर लक्षात आले. मला नन्हे पंडीतवर संशय आहे, त्यानेच माझ्या पत्नीला पळवले असेल”, अशी कैफियत राजूने आपल्या तक्रारीत मांडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा कुमारी यांनी सांगितले की, राजूच्या तक्रारीनंतर त्यांनी राजेश्वरी आणि नन्हे पंडीत यांचा शोध सुरू केला आहे. सदर महिलेचे अपहरण झाले की स्वतः पळून गेली, याचा शोध घेतला जात आहे.

Story img Loader