सामाजिक विषयांवर वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडणारे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे. आंध्र प्रदेशमधील विझियानगरम जिल्ह्यातील राजम भागात असणाऱ्या जीएमआर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील परिस्थिती आणि सिंगापूरमधील परिस्थितीची तुलना करताना कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढे येऊन नेतृत्व स्वीकारण्याचं आवाहनही केलं.

काय म्हणाले नारायण मूर्ती?

नारायण मूर्तींनी यावेळी बोलताना भारत आणि सिंगापूरमधील वास्तवातला फरत सांगितला. “आपण सगळ्यांनीच कोणत्याही कमतरतेकडे बदलाची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वत नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे”, असं नारायण मूर्ती यावेळी म्हणाले.

abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
sharad pawar review meeting in pune for baramati lok sabha constituency
सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; बारामती लोकसभेची पुण्यात आढावा बैठक

भारत आणि सिंगापूरमधील वास्तव!

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण मूर्ती यांनी भारत आणि सिंगापूरमधील वास्तवाविषयी भाष्य केलं. “भारतात वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, घाणेरडे रस्ते, प्रदूषण आणि बहुतेक वेळा सत्तेचा अभाव असं चित्र असतं. पण सिंगापूरमध्ये वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, स्वच्छ पर्यावरण आणि लोकांकडे असणारी सत्ता”, असं ते म्हणाले. “तरुणांनी समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता घडवायला हवी. आपल्या स्वत:च्या हिताच्याही आधी लोकांचं, समाजाचं आणि देशाचं हित ठेवायला हवं”, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

नारायण मूर्तींनी मान्य केली चूक!

दरम्यान, एन. नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केली आहे. इन्फोसिसचे अध्यक्ष म्हणून केलेल्या त्या चुकीचा आपल्याला सर्वाधिक पश्चात्ताप होतो, असंही ते म्हणाले. “संस्थापकांच्या मुलांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ नये, अशी भूमिका मांडणं ही माझी चूक होती. संस्थापकांच्या पुढच्या पिढीला इन्फोसिसमधून बाहेर ठेवणं ही चूक होती”, असं मूर्ती यांनी यावेळी नमूद केलं.