विरोधकांवर टीका करण्यासाठी नरेंद मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला.मध्य प्रदेशमधील प्रचारसभेत पंतप्रधानांनी भाजपवर चौफेर टीका केली.
लोकशाहीमध्ये सकारात्मक टीका करता येते. भाजप नेते मात्र उत्साहाच्या भरात स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजपने नकारात्मक राजकारण सुरू केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. कोणतेही काम न करणाऱ्या मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकारला पराभूत करा, असे आवाहन त्यांनी केले. गुजरातच्या विकासाबद्दल भाजप दावे करते, मात्र त्यातील पोकळपणा उघड झाला आहे. भाजपने आपली विचारसरणी बदलावी, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती हे भाजपने विसरू नये याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2013 रोजी प्रकाशित
मोदी खोटारडे, पंतप्रधानांचा आरोप
विरोधकांवर टीका करण्यासाठी नरेंद मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला.मध्य प्रदेशमधील प्रचारसभेत पंतप्रधानांनी
First published on: 18-11-2013 at 01:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi lies manmohan singh