लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱयांची खिल्ली उडवली आहे. मोदी फक्त आपले कपडे धुवून घेण्यापुरतचे भारतात येतात, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला आहे.

परदेश दौऱयाच्या मुद्द्यावरून याआधी लालूप्रसाद, नितीश आणि काँग्रेस नेत्यांनी मोदींना अनेकदा लक्ष्य केले आहे. त्याचीच री ओढत लालूपुत्र तेजस्वी यांनी मोदींवर शरसंधान साधले आहे. देशातील विकास कामांकडे लक्ष देण्यास पंतप्रधानांना वेळ नाही.  जनतेने परदेश दौरे करण्यासाठी आपल्याला निवडून दिलेले नाही, हे मोदींनी लक्षात घ्यायला हवे, असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच येत्या काळात बिहारच्या जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करणार असल्याचेही तेजस्वी यादव म्हणाले.