पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे भाजपाला देखील नाकारून पंजाबच्या मतदारांनी आम आदमी पक्षाच्या पारड्यात आपला कौल दिला. भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले. पण गेल्या सहा महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद अद्याप शमण्याचं चिन्ह दिसत नाहीयेत. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणारे काँग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू यांनी आधी आपला निवडून दिल्याबद्दल पंजाबच्या लोकांचं अभिनंदन केल्यानंतर आता भगवंत मान यांना शुभेच्छा देताना पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. निकालांनंतर नवजोतसिंग सिद्धू यांनी याआधीच पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पंजाबच्या जनतेचे आभार!

नवजोतसिंग सिद्धू यांनी निकालांनंतर प्रतिक्रिया देताना पंजाबच्या लोकांचं अभिनंदन केलं होतं. “आम आदमी पक्षाला मत देऊन पंजाबच्या लोकांनी उत्तम निर्णय घेतला आहे. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो. आपण त्याचा नम्रपणे स्वीकार करायला हवा”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

आता काँग्रेसलाच दिली ‘माफिया’ची उपमा?

दरम्यान, आज नवजोतसिंग सिद्धू यांनी केलेल्या सूचक ट्वीटमध्ये भगवंत मान यांना शुभेच्छा देताना त्यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. “सर्वात आनंदी व्यक्ती तो असतो, ज्याच्याकडून कुणीही काही अपेक्षा ठेवत नाही. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये माफियाविरोधी पर्वाचा झेंडा फडकावला आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा डोंगर आहे. ते या अपेक्षा पूर्ण करतील आणि पंजाबला पुन्हा एकदा चांगले दिवस दाखवतील, लोकाभिमुख धोरणं राबवतील अशी आशा आहे”, असं सिद्धू म्हणाले आहेत.

“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला!

निवडणुकांच्या आधी सहा महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला होता. नवजोतसिंग सिद्धू यांचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत तीव्र मतभेद झाले होते. अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी देखील सिद्धूंचे मतभेद होते. पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून हे मतभेद मिटवले होते. मात्र, निवडणुकांमध्ये काँग्रेसला या अंतर्गत कलहाचा फटका बसल्याचं आता बोललं जात आहे.