Nitin Gadkari On Accidents : देशात गेल्या काही वर्षात वाढलेल्या रस्ते अपघातातील मृत्युंमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अशात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच संसदेत सांगितले की, रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. तरीही लोकांमध्ये कायद्याचा आदर किंवा भीती नसल्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वत: रस्ता अपघाताला बळी पडले आहेत आणि या विषयाबाबतचे गांभीर्य त्यांना माहित आहे.

माझा पाय चार ठिकाणी मोडला होता

लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान रस्ते अपघातांविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, “रस्ते बांधणी, ऑटोमोबाईल इंजीनियरिंग, कायद्याची अंमलबजावणी, लोकांनी कायदे पाळणे आणि लोकशिक्षण, हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी चार महत्त्वाचे घटक आहेत. पण, समाजाची सर्वात मोठी समस्या ही आहे की, लोकांना ना कायद्याचा आदर आहे, ना त्यांना त्याची भीती आहे. लोक सिग्नल पाळत नाहीत, हेल्मेट घालत नाहीत. ३० हजार लोक हेल्मेट न घातल्यामुळे मरतात अशा समस्या आहेत. मी स्वतः अपघाताचा बळी ठरलो आहे, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असताना झालेल्या अपघातात माझा पाय चार ठिकाणी मोडला होता.”

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Security forces managed to kill 12 Naxalites in an encounter on border of Bijapur Sukma district in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; बस्तर सीमा भागात सुरक्षा यंत्रणेसोबत…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
karjat jamkhed latest news in marathi
कर्जत : जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार
Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Tilak Street , Pune, vehicle broke door shop ,
पुणे : टिळक रस्त्यावर मध्यरात्री थरार, भरधाव मोटार दुकानाच्या दरवाजा तोडून आत शिरली

रस्ते अपघातात १.६८ लाख मृत्यू

लोकसभेला रस्ते अपघातांबाबत माहिती देताना नितीन गडकरी पुढे म्हणाले, “खूप प्रयत्न करूनही यावर्षी १.६८ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, याची खंत वाटते. रस्त्यांवरील नियमांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यामुळे या मृत्यूंची संख्या मोठी आहे. लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे किंवा समाज यांच्या सहकार्याशिवाय अपघात कमी करणे शक्य नाही. आम्ही वाहतूक नियम न पाळणाऱ्यांसाठी दंडही वाढवला आहे पण लोक नियम पाळत नाहीत.”

हे ही वाचा :  “बाबरी मशिद प्रकरणात न्यायाची थट्टा…” मशिदी आणि दर्ग्यांविरोधात दाखल होणाऱ्या खटल्यांवर माजी न्यायमूर्तींचे मोठे भाष्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी देशात ४.८० लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात १.७२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २०२२ च्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीशी तुलना केली असता, अपघातांमध्ये ४.२ टक्क्यांनी आणि मृतांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ४.६१ लाखांहून अधिक रस्ते अपघात आणि १.६८ लाखांहून अधिक मृत्यू झाले होते.

Story img Loader