केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचं पालन केलं जात नाही असं म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे. हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचं पालन केलं जात नाही असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे नितीन गडकरींनी?

“आपला देश असा आहे की आपल्या देशात हिंदू समाजाची जी मंदिरं आहेत तिथे स्वच्छता नसते. धर्मशाळा चांगल्या नसतात. मी लंडनमध्ये एका गुरुद्वारात गेलो होतो, रोमच्या चर्चमध्ये जाऊन आलो काही देशांमधल्या मशिदीही पाहिल्या तिथलं वातावरण स्वच्छ होतं. ते पाहून मला हे कायमच वाटत होतं की आपली जी श्रद्धास्थानं आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत. मला जेव्हा यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रातल्या देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींची मान्यता दिली. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही करतो आहोत.” असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी

कैलास मानसरोवर मार्गाचं ८० टक्के काम पूर्ण

नितीन गडकरी यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. पूर्वी नेपाळमधून जावं लागायचं आणि या दरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा.

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?

प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामांचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल अर्थात DPR हा अचूक असला पाहिजे. नितीन गडकरींनी ३१ मे रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. त्यात त्यांनी विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.