ढाका : बांगलादेशमध्ये अटकेत असलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून, चितगाव न्यायालयात त्यांच्या जामिनावर आता २ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी कोणताही वकील पुढे येत नसल्याने न्यायालयाने जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली.

दास यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र, त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले नाही. सुनावणीवेळी चितगाव न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दास यांचे प्रतिनिधित्व करणारा कुठलाही वकील नसल्यामुळे सत्र न्यायाधीशांनी जामीन अर्जावरील निकालासाठी पुढील तारीख दिल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. राजकीयदृष्ट्या प्रेरित वकिलांच्या गटांच्या धमक्यांमुळे दास यांना कुठलाही वकील मिळाला नसल्याचा दावा त्यांचे सहकारी स्वतंत्र गौरंग दास यांनी केला आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Big Action on Illegal Bangladeshis Intruders in mumbai
मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगलादेशी येतात कसे? त्यांना कागदपत्रे मिळतात कशी?
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
ramesh mantri
पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!

हेही वाचा >>> भारत-चीन संबंधात थोडीफार सुधारणा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे लोकसभेत निवेदन

ब्रिटनकडून चिंता व्यक्त

लंडन : बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांवर आणि हिंदू नेत्याच्या अटकेवर ब्रिटनने मंगळवारी चिंता व्यक्त केली. मजूर पक्षाचे खासदार बॅरी गार्डिनर यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. हिंद-प्रशांत भागासाठीच्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री कॅथरिन वेस्ट यांनी सांगितले, की बांगलादेशमधील गेल्या महिन्यामधील भेटीत हंगामी सरकारने अल्पसंख्याकांसाठी मदत उपलब्ध असल्याची माहिती आपल्याला दिली आहे. ढाक्यामध्ये सर्वप्रथम येऊन प्रा. युनूस यांच्याशी ब्रिटनने संवाद साधला आणि अल्पसंख्याकांबरोबर असल्याचे कृतीद्वारे दाखवून दिले. बांगलादेशमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत.

भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घालावी

भारतीय वृत्तवाहिन्यांवर बांगलादेशात बंदी घालावी, अशा मागणीची याचिका बांगलादेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वाहिन्यांवर प्रक्षोभक वृत्ते प्रसारित होत असल्याचा दावा त्यात केला आहे. वकिल इखलास उद्दिन भुईयाँ यांनी याचिका दाखल केली आहे.

हजारो आंदोलकांची निदर्शने

आगरतळा : त्रिपुरामध्ये चिन्मय दास यांच्या हजारो समर्थकांनी मंगळवारी दास यांच्या सुटकेसाठी निदर्शने केली. ‘सनातनी युवा’ अंतर्गत हा मोर्चा काढण्यात आला. निदर्शक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले.

Story img Loader