ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या घटनेवरून विरोधी पक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याला आता अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ही राजकारण करण्याची वेळ नाही,” अशा शब्दांता अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांनी फटकारलं आहे.

“ही राजकारण करण्याची वेळ नाही. बचावकार्यावर आमचं लक्ष आहे. पूर्ण ताकदीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देत आवश्यक सूचना दिल्या आहे. घटनेची चौकशी करून १५ ते २० दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल,” अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

रेल्वेच्या ‘कवच’ या यंत्रणेवरूनही विरोधी पक्षाने अश्विनी वैष्णव यांना लक्ष्य केलं. यावर रेल्वेमंत्री म्हणाले की, “ही बाब कवच यंत्रणेची नाही. तपास अहवालात सर्व काही समोर येईल. अशा प्रकारच्या अपघातात मानवी संवेदनशीलता खूप महत्वाची आहे. आमचं पहिलं काम बचावकार्याचं आहे,” असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली आहे. यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ही घटना दुर्दैवी असून, मनाला विचलित करणारा अपघात आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झालाय, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दुख:त सहभागी आहे.”

“सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर आहे. सर्व तपासाचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार आहे. त्यांना सोडणार नाही. ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. येथील नागरिकांनाही संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचं काम केलं,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.