Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेने अख्खा देश हादरला आहे. या दुर्घटनेत तब्बल २८८ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर १,१०० हून अधिक प्रवासी यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधी पक्ष या घटनेवरून सरकारवर आणि रेल्वे मंत्रालयावर आरोप करत आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही सरकारवर हल्लाबोल केला आहे. या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी एक पत्रकार परिषद घेऊन रेल्वे विभागाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवलं.

माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास म्हणाले, अलिकडच्या काळात अशी रेल्वे दुर्घटना कधीच झाली नाही. या दुर्घटनेत शेकडो लोकांनी जीव गमावला. तर एक हजारहून अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. भक्त चरण दास यांनी दावा केला आहे की, दुर्घटनेनंतर हजारो रेल्वे प्रवाशांनी त्यांच बूक झालेलं रेल्वेचं तिकीट रद्द केलं आहे. कारण त्यांना वाटतं की, रेल्वेने प्रवास करणं आता सुरक्षित नाही.

congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
There is no solution even in the meeting in Delhi regarding the dispute of Chandrapur Gadchiroli in Congress
काँग्रेसमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीचा वाद कायम; दिल्लीतील बैठकीतही तोडगा नाही, येत्या दोन दिवसांत निर्णयाची शक्यता

हे ही वाचा >> “…तर मी राजकारण सोडेन”, कृपाल तुमानेंच्या ‘त्या’ आरोपांवर अजित पवार संतापले

भक्त चरण दास यांचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ रिट्वीट करून इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) काँग्रेसला उत्तर दिलं आहे. यात आयआरसीटीसीने म्हटलं आहे की, खरंतर हा दावा चुकीचा आहे. तिकीट रद्द करण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. उलट तिकीट रद्द करण्याचं प्रमाण घटलं आहे. ०१ जून रोजी ७.७ लाख तिकीटं रद्द करण्यात आली होती. तर ०३ जून रोजी ७.५ लाख तिकीटं रद्द करण्यात आली.