scorecardresearch

“पनवती! मोदींमुळे भारत हरला”, राहुल गांधींचा हल्ला; भाजपाचं प्रत्युत्तर…

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ कमकुवत पडल्याने ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यावरून अनेकजण तेथे उपस्थित असलेल्या लोकांना टार्गेट करत आहेत. तसंच, राहुल गांधींनीही ही संधी सोडली नाही.

Rahul Gandhi on Narendra Modi over World cup 2023
राहुल गांधींची मिश्किल टिप्पणी (फोटो – काँग्रेस एक्स)

Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India : विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना नुकताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे झाला. भव्य स्टेडिअमवर झालेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचं लक्ष होतं. भारतातील सर्व क्रिकेटमंडळी रविवारी भारतीय संघ जिंकेल या आशेवर होते. परंतु, ऐनवेळेला भारतीय संघ कमकुवत पडला आणि ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यावेळी अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटीमंडळी स्टेडिअमवर हा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हा सामना पाहण्यासाठी हजर होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

“आपली मुलं चांगल्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पनवतीमुळे आपण हरलो”, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतु, त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. त्यांच्या या वाक्याने जनसमुदायातून हर्षोल्लासाचा आवाज आला. “टीव्हीवाले हे नाही सांगणार की (कोण पणवती), पण जनतेला माहितेय”, असंही ते पुढे म्हणाले. काँग्रेसने यासंदर्भातील व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात गोंधळ घालणारा ‘जार्व्हो ६९’ आहे तरी कोण? जाणून घ्या
Pakistan vs Netherlands Match In World Cup 2023
PAK vs NED: नेदरलँडविरुद्धच्या सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवानने केले नमाज पठन, VIDEO होतोय व्हायरल
australia westindies refused to play in srilanka
Cricket World Cup: जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता
IND vs AUS: KL Rahul slams fitness questioners Said wicketkeeping is getting better in last few matches
KL Rahul: फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना राहुलभाईचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “गेल्या काही सामन्यांत…”

भाजपाचं प्रत्युत्तर

राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरून आता त्यांनी माफी मागावी अशी भाजपाने मागणी केली आहे. भाजपाचे नेते रवी शंकर यांनी टाईम्सा दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, तुम्हाला काय झालंय राहुल गांधी? तुम्ही देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहात. आपल्या पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचं मनोबल उंचावलं. हरणं आणि जिंकणं हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे.

“तुम्ही तुमच्या इतिहासातून शिकलं पाहिजे. तुमच्या आई सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हणायच्या आणि आता काँग्रेसची अवस्था काय झाली आहे बघा”, असंही रवी शंकर प्रसाद म्हणाले.

दरम्यान, विश्वचषक २०२३ मध्ये भारताची कामगिरी चांगली राहिली. अटीतटीच्या ठरलेल्या अनेक सामन्यांत भारताने डाव साधला. त्यामुळे अंतिम सामनाही आपल्याच पदरात पडेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. याकरता सर्व स्तरातून भारतीय खेळाडूंसाठी शुभेच्छा आल्या होत्या. इतकंच नव्हे तर उपास-तापास, होम-हवनही करण्यात आलं होतं. हा क्षण स्टेडिअमवर जाऊन पाहण्याकरता अनेकांनी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गर्दी केली होती. यामध्ये अनेक राज्यातील नेते, मंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह रणबीर कपूर वगैरे मंडळी हजर होती. परंतु, ऐनवेळी समस्त भारतीयांचं स्वप्न धुळीस मिळालं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Our indian cricket team would have won world cup 2023 but panavati direct statement of rahul gandhi said the tv guys sgk

First published on: 21-11-2023 at 16:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×