Oxfam Report : ब्रिटिशांनी भारतावर राजवट केली त्या काळात ब्रिटिशांनी भारतातून किती संपत्ती लुटली? यासंदर्भातील माहिती आता एका अहवालातून समोर आली आहे. ब्रिटिशांनी दीडशे वर्षांत भारतातून लुटलेल्या संपत्तीचा आकडा या अहवालातून सांगण्यात आला आहे. तसेच जेवढी संपत्ती भारतातून लुटली त्या संपत्तीचा फायदा फक्त काही टक्के श्रीमंत लोकांनीच घेतल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

ब्रिटिशांनी भारतात केलेल्या राजवटीच्या काळात किती संपत्ती लुटली? यासंदर्भातील ऑक्सफॅम इंटरनॅशनलने अहवाल महत्वाची माहिती दिली आहे. या अहवालात असं म्हटलं आहे की, १७६५ ते १९०० या काळात ब्रिटिशांनी भारतातून तब्बल ६४.८२० लाख कोटी डॉलर्स रक्कम लुटली. मात्र, या लुटलेल्या संपत्तीतील सर्वाधिक ३३,८०० अब्ज डॉलर संपत्ती ही फक्त १० टक्के श्रीमंत लोकांकडे गेली, अशी माहिती ऑक्सफॅमच्या अहवालात देण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.

CIDCO assurance Dronagiri Node project victims plots uran navi mumbai
सिडकोकडून द्रोणागिरी नोड प्रकल्पग्रस्तांना पुन्हा भूखंडाचे आश्वासन, ३५ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रतीक्षा कायम
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
trade war Nifty news in marathi
मोठ्या आपटीतून सावरला, तरी ‘सेन्सेक्स’चे ३१९ अंशांचे नुकसान ; व्यापार युद्धाच्या धास्तीने जागतिक बाजारात मात्र मोठी पडझड
India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
Liquidity in the banking system fell to a 15 year low print eco news
बँकिंग व्यवस्थेतील तरलता १५ वर्षांच्या तळाला; उपायादाखल रिझर्व्ह बँकेकडून ६०,००० कोटींची लवकरच रोखे खरेदी
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन

दरम्यान, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या काही तास आधी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या आधी प्रसिद्ध केला जातो. या अहवालात अनेक अभ्यास आणि शोधनिबंधांचा हवाला देत आधुनिक बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन ही केवळ वसाहतवादाची निर्मिती असल्याचं म्हटलं आहे.

ऑक्सफॅमने म्हटलं की, “ऐतिहासिक वसाहतीच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या असमानता आणि लुटमारीच्या विकृती या अद्यापही आधुनिक काळात एक नवीन आकार देत आहेत. या गोष्टीमुळे सध्याचं जग असमान निर्माण झालेलं आहे. त्यामुळे वंशवादावर आधारित विभाजन झालेलं आणि ग्रासलेले जग निर्माण होत आहे. विविध अभ्यास आणि संशोधन पेपर्सच्या आधारे ऑक्सफॅमने केलेल्या अभ्यासास असं आढळून आलं की,१७६५ ते १९०० या काळात ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत १० टक्के लोकांनी केवळ भारतातून ३३,८०० अब्ज डॉलर्सची संपत्ती लूटली.

तसेच १७६५ ते १९०० या वसाहतवादाच्या काळात ब्रिटनने भारतातून लुटलेल्या संपत्तीबाबत अहवालात असंही म्हटलं की सर्वात श्रीमंत लोकांव्यतिरिक्त वसाहतवादाच्या मुख्य लाभार्थ्यांमध्ये नव्याने उदयास आलेल्या मध्यमवर्गाचाही समावेश आहे. तसेच दीडशे वर्षांच्या काळात ब्रिटिशांनी भारतातून लुटलेल्या संपत्तीचे लाभार्थी अतिश्रीमंतांच्या पलीकडे वसाहतवादाचे मुख्य लाभार्थी नव्याने उदयास आलेले मध्यमवर्ग होते. सर्वात श्रीमंत १० टक्के ज्यांना या उत्पन्नाच्या ५२ टक्के मिळाले आणि नवीन मध्यमवर्गाला आणखी ३२ टक्के मिळाले.

Story img Loader