India Pakistan War Tensions Updates : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तसेच या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक देखील गंभीर जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासह सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला. तसेच पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचाही निर्णय घेतला.
तसेच भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचलत पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या लष्करी कावाईची चिंता लागल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून घेतले जाणारे निर्णय आणि त्याचे होणारे परिणाम यासंबंधीच्या सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Pahalgam Terror Attack India Pakistan Live Updates 4 May 2025 : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेला भारत-पाकिस्तान तणाव यासह आदी घडामोडी एका क्लिकवर...
पहलगाममध्ये १५ दिवसांपूर्वी दुकान उघडले, पण घटनेच्या दिवशी ठेवले बंद; ‘तो’ दुकानदार NIA च्या रडारवर
Pahalgal Terror Attack Investigation : पहलगाम येथे १५ दिवसांपूर्वीच नव्याने दुकान उघडलेल्या दुकानदाराने दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी मात्र दुकान बंद ठेवलं होतं. त्याची ही कृती संशयास्पद आढळल्याने सर्व तपास यंत्रणांनी आता त्याची चौकशी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनही त्याची चौकशी होणार आहे, इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Video: “युद्ध सुरू झाल्यास मी इंग्लंडला जाईन”, पाकिस्तानी राजकारण्यांनाही भारताच्या लष्करी कारवाईची भीती
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना वाढत्या पोसत असल्याने भारताने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तान विरोधात लष्करी कारावाई करण्याच्या तयारीत आहे.
२०२५ मध्ये सर्वाधिक लष्करी मनुष्यबळ असलेले ‘हे’ आहेत टॉप १० देश; भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक कितवा?
जागतिक पातळवरील अस्थिरता आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल यामुळे अनेक देश आता त्यांच्या संरक्षण धोरणाचे पुनर्मूल्यांकन करत आहेत. यासाठी लष्करी खर्चात वाढ करणे आणि सैन्याची कुमक वाढविण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, शीत युद्धाचा शेवट झाल्यानंतर जागितक स्तरावर लष्काराच्या खर्चात वाढ करण्यास सुरुवात झाली. मागच्या वर्षी हा खर्च एकूण २.७१८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला. २०२३ च्या तुलनेत यात ९.४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये भीषण अपघात; लष्कराचा ट्रक ६०० फूट खोल दरीत कोसळल्याने ३ जवानांचा मृत्यू
भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, भेटीत काय चर्चा झाली?
भारतीय हवाई दल प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती सांगितली जाते. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची ही भेट महत्वाची मानली जाते.
Pakistani Spies Arrested : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई
भारतीय हवाई दल प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला
भारतीय हवाई दल प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे. या भेटीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक, केंद्र सरकारची कारवाई
Video: "युद्ध सुरू झाल्यास मी इंग्लंडला जाईन", पाकिस्तानी राजकारण्यांनाही भारताच्या लष्करी कारवाईची भीती
भारतीय हवाई दल प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला
भारतीय हवाई दल प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे. या भेटीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsIndian Air Force Chief Air Marshal Amar Preet Singh is meeting Prime Minister Narendra Modi right now: Sources pic.twitter.com/qytnt88F0G
— ANI (@ANI) May 4, 2025
"सरकार जी कारवाई करेल, त्याला आमचा पाठिंबा, पण...", पहलगाम हल्ल्याबाबत असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं की, "सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकारला (पहलगाम हल्ल्याविरुद्ध) कारवाई करण्यास आणि पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्यास आणि दहशतवादाचा नायनाट करण्यास सांगितलं आहे. सरकार कोणतीही कारवाई करेल, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण ते काय करतील आणि कधी करतील, हे त्यांना सांगण्याची गरज आहे", असं खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.
https://platform.twitter.com/widgets.js#watch | Darbhanga, Bihar: AIMIM chief and MP Asaduddin Owaisi says, " During the all-party meeting, opposition asked the govt to take action (against Pahalgam attack) and give justice to the victims' families and eliminate terrorism. Whatever action the government takes, we are… pic.twitter.com/Rly9q5pFyx
— ANI (@ANI) May 4, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इम्रान खान, बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत.
“ते अपयशी राष्ट्र, भारताला शांततेत जगू देणार नाही”, असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला फटकारले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर जगभरातून टीका होता. याचबरोबर देशातील सर्व पक्षही राजकारण बाजूला ठेऊन केंद्र सरकारबरोबर उभे आहेत. अशात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतेच पाकिस्तानला फटकारले आहे. त्यांनी पाकिस्तानचे वर्णन “एक अपयशी राष्ट्र”, असे केले आहे. याचबरोबर पाकिस्तान भारताला शांततेने जगू देणार नाही, असेही म्हटले आहे.
'पहलगाम हत्याकांडाच्या काही दिवस आधी गुप्तचर यंत्रणेने दिला होता हल्ल्याचा इशारा', अधिकाऱ्यांची माहिती
पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही सुरुच, सलग दहाव्या दिवशी LOC वर गोळीबार, भारताकडूनही चोख प्रत्युत्तर!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अद्यापही कुरापती सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. सलग दहाव्या दिवशी LOC वर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे, तर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारताच्या लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं असल्याची माहिती सांगितली जात आहे.
भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला BSF कडून अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असताना सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) मोठे यश मिळाले आहे. बीएसएफने राजस्थान सीमेवर एका पाकिस्तानी जवानाला अटक करुन ताब्यात घेतले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये सुरक्षा दलांना हे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, पाकिस्तानी जवान सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता, त्यानंतर बीएसएफने त्याला रोखले आणि ताब्यात घेतले. तो कोणत्या उद्देशाने सीमा ओलांडत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला BSF कडून अटक, (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)