scorecardresearch

Premium

जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पनीरसेल्वम यांचे उपोषण

५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे निधन झाले होते.

Tamil Nadu , Jayalalithaa , O Panneerselvam , J Jayalalithaa , Tamilnadu , E palaniswami , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Jayalalithaa death : चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात ७५ दिवसांच्या उपचारानंतर ५ डिसेंबरला जयललिता यांचे निधन झाले होते. या दरम्यानच्या काळात जयलिलता यांच्या प्रकृतीविषयी कोणालाही फारशी माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

अण्णाद्रमुक पक्षाच्या माजी सर्वेसर्वा जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत. तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकल याठिकाणीही पनीरसेल्वम यांचे समर्थक उपोषणाला बसणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता या उपोषणाला सुरूवात झाली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. अण्णाद्रमुक पक्षातचे पनीरसेल्वम यांचे समर्थक खासदार आणि आमदार या उपोषणात सहभागी झाले आहेत. चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात ७५ दिवसांच्या उपचारानंतर ५ डिसेंबरला जयललिता यांचे निधन झाले होते. या दरम्यानच्या काळात जयलिलता यांच्या प्रकृतीविषयी कोणालाही फारशी माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे  पनीरसेल्वम यांच्यासह अनेकांनी अम्मांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत याप्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. अपोलो रुग्णालयाच्या अहवालात म्हटले होते, की जयललिता यांच्या मृत्यूस अनेक घटक कारणीभूत ठरले, त्यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या. अपोलो रुग्णालयाने केलेले उपचार व एम्स रुग्णालयाचा अहवाल यातील माहिती राज्य सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. जयललिता यांना सर्वोत्तम औषधे व उपचार देण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अनेक वैद्यकीय समस्या होत्या. ५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे निधन झाले होते.

तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले, की चुकीच्या औषधांमुळे जयललिता यांची प्रकृती आणखी बिघडली हा आरोप खरा नसल्याचे म्हटले होते. अटॉपिक डर्मिटिटिससाठी त्यांना कार्टकिोस्टेरॉइड्स देण्यात आली होती व नंतर त्यांना हायपोग्लायेमिक व हायपरटेन्सिव्ह औषधे दिली गेली. त्यांना डायबेटिस मेलिटस व हायपरटेन्शन असे दोन विकार होते. २२ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना रात्री दहा वाजता रुग्णालयात दाखल केले, तेव्हा रुग्णवाहिका त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांना श्वास घेता येत नव्हता व ऑक्सिजन कमी पडत होता, त्यांना चक्कर आली होती. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात ४ डिसेंबरला त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असता हृदयविकाराचा मोठा झटका आला होता. जयललिता यांच्या उपचारांबाबत ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही, असे एम्सच्या अहवालाच्या आधारे म्हणता येते, असे राधाकृष्णन यांनी सांगितले होते. यात आम्ही काही लपवून ठेवलेले नाही, अहवालात सगळे  स्पष्ट केलेले आहे. हृदयविकारानंतर त्यांना एक्स्ट्राकॉरपोरियल मेमब्रेन ऑक्सिजनेशन देण्यात आले होते, त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय सोपस्कारांप्रमाणे सर्व प्रयत्न केले होते, असा दावा राधाकृष्णन यांनी केला होता.

dada bhuse sanjay raut, defamation case against sanjay raut, 178 crores fraud, samna newspaper fake news
संजय राऊत यांच्या विरोधात मालेगावात बदनामीचा खटला, दादा भुसे यांच्यावरील आरोप प्रकरण
SBI chairman dinesh khara
SBI Chairman: सरकारने स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांचा कार्यकाळ वाढवला, ते SBI चे चेअरमन किती काळ राहणार?
online fraud
साडेपाच कोटींची फसवणूक; भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध गुन्हा
Goods worth 53,000 seized from two thieves Dhule
धुळ्यात दोन चोरांकडून ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Panneerselvam leads hunger strike demanding probe into jayalalithaa death

First published on: 08-03-2017 at 14:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×